कारण ‘व्यास’ ही एक सामूहिक नेणीव आहे. हा दृष्टिकोन घेऊन महाभारत वाचणाऱयाला मग महाभारताचा उलगडा आजच्या वर्तमानाच्या संदर्भात होऊ लागतो आणि मग महाभारत ही केवळ एक पुराणकथा न राहता प्रत्येक पिढीसाठी ते वर्तमानातलं एक वास्तव बनतं. या वास्तवाचं भान सतत जागं ठेवलेली, मोठी वैचारिक उंची गाठलेली ‘व्यासांचा वारसा’ ही आनंद विनायक जातेगांवकरांची कलाकृती त्यांच्या प्रतिभेची साक्ष आहे. लखलखीत विचार आणि तितक्याच लखलखीत भाषाशैलीत समोर येणारं हे पुस्तक आपल्याला केवळ दिपवून टाकणारं आहे. महाभारतावरचं हे अप्रतिम विवेचन प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं!
कारण ‘व्यास’ ही एक सामूहिक नेणीव आहे. हा दृष्टिकोन घेऊन महाभारत वाचणाऱयाला मग महाभारताचा उलगडा आजच्या वर्तमानाच्या संदर्भात होऊ लागतो आणि मग महाभारत ही केवळ एक पुराणकथा न राहता प्रत्येक पिढीसाठी ते वर्तमानातलं एक वास्तव बनतं. या वास्तवाचं भान सतत जागं ठेवलेली, मोठी वैचारिक उंची गाठलेली ‘व्यासांचा वारसा’ ही आनंद विनायक जातेगांवकरांची कलाकृती त्यांच्या प्रतिभेची साक्ष आहे. लखलखीत विचार आणि तितक्याच लखलखीत भाषाशैलीत समोर येणारं हे पुस्तक आपल्याला केवळ दिपवून टाकणारं आहे. महाभारतावरचं हे अप्रतिम विवेचन प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं!